भोज्जा

बुधवार, ३० मार्च, २०११

अफ़्रिदीचा.... वारू रोखला

फ़ायनलचे स्वप्न दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या समोरच भंगले




भारतीय संघाचे पाक वरील विजया बद्दल हार्दीक अभिनंदन.अंतीम सामन्या साठी भारतीय संघास हार्दीक शुभेच्छा.

मो.रफ़ी....अजरामर आवाज

"अविस्मरणीय रफ़ी"
आज कसे कोण जाणे पण अचानक रफ़ीचे १९६४ सालात आलेल्या "चा चा चा" मधले, "सुबह न आयी... शाम न आयी..."हे गाणे एकदम आठवले.खरे तर "चा चा चा" हे गमतीदार अन तितकेच विचित्र नाव केवळ ह्या गाण्यामुळे अजरामर झालयं,अन्यथा, १९६४ मधे आलेल्या अन लेखक,निर्माता,दिग्दर्शक आणि नायक अशा सगळ्या आघाड्या एकट्याने सांभाळलेल्या,त्याच्या काळात प्रसिद्ध असलेल्या चंद्रशेखरला,तब्बल १६२ हिंदी सिनेमातून काम करून ही फ़ार कोणी लक्षात ठेवेल असे वाटत नाही.अगदी त्याच्या रहात्या अंधेरी वेस्ट रेल्वेलाईन जवळचे रहिवासी सुद्धा.आजची तरूण पिढी आमीरच्या "थ्री ईडियट" मधील "एअर लाईन ग्राऊंड स्टाफ़ २" ही त्याची भूमिका एव्हाना विसरली देखील असेल, अन आमिताभच्या ८२ मधे आलेल्या "नमक हलाल" मधील "मेहता वकील" ही त्याची भूमिका आधीच्या पिढीला सुद्धा आठवावी लागेल.पण हेलनला कोण विसरू शकेल? अहो,ती या चित्रपटाची चक्क नायिका होती.कॅब्रे डान्सर म्हणून तिची कारकीर्द नंतर बहरली.असो.


ईक्बाल कुरैशीचे संगीत,गोपालदास "नीरज" चे काव्य आणि रफ़ी साहेबांचा अफ़लातून आवाज अशी भन्नाट भट्टी जमून आल्याने हे गाणे "अजरामर" ह्या कॅटेगिरीत जाऊन बसले आहे.माझ्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी एक,आज खास तुमच्या साठी.भारत-पाकिस्तान मॅचला अजुन खूप अवकाश आहे.ऐकताय नां?  



मंगळवार, २९ मार्च, २०११

फरक... ’तेव्हाच्या’ आणि ’आत्ताच्या’ मधील

            १९८३ चे खरोखरचे विजेते अष्टपैलू बोलर्स

वन डे मॅचला आवश्यक असणाऱ्या ईंग्लिश स्पोर्टी खेळपट्ट्या,घरच्या  प्रेक्षकांचा नसलेला दबाव,अपेक्षांचे नसलेले ओझे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खरोखरचे विकेट घेणारे बोलर्स,हे १९८३ च्या विजेत्या संघात विजेते होण्यासाठी असणारे आवश्यक गुण होते. अंतीम सामन्यातील गोलंदाजांचे पॄथक्करण ह्याची साक्ष देते.
११ ओव्हर्स ४ मेडन २१ धावा १ विकेट

सोमवार, २८ मार्च, २०११

अपेक्षांचे ओझे

 
भारत-पाकिस्तान दोन्ही संघांचे कर्णधार सध्या त्यांच्या चाहत्यांच्या "अपेक्षांचे ओझे" असे वहात आहेत.

रविवार, २७ मार्च, २०११

दॄष्टिकोन

दॄष्टिकोनाचे महत्व

गणितातील सौंदर्या कडे एका वेगळ्या नजरेने,दृष्टिकोनातून बघितल्यास आपल्याला गणिताची एक वेगळीच अनुभूति येईल.
1 x 8 + 1 = 9 
12 x 8 + 2 = 9 8
123 x 8 + 3 = 9 8 7
1234 x 8 + 4 = 9 8 7 6
12345 x 8 + 5 = 9 8 7 6 5
123456 x 8 + 6 = 9 8 7 6 5 4
1234567 x 8 + 7 = 9 8 7 6 5 4 3
12345678 x 8 + 8 = 9 8 7 6 5 4 3 2
123456789 x 8 + 9 = 9 8 7 6 5 4 3 2 1 

1 x 9 + 2 = 11 
12 x 9 + 3 = 111 
123 x 9 + 4 = 1111 
1234 x 9 + 5 = 11111 
12345 x 9 + 6 = 111111
123456 x 9 + 7 = 1111111
1234567 x 9 + 8 = 11111111
12345678 x 9 + 9 = 111111111 
123456789 x 9 +10= 1111111111

9 x 9 + 7 = 88
98 x 9 + 6 = 888 
987 x 9 + 5 = 8888 
9876 x 9 + 4 = 88888 
98765 x 9 + 3 = 888888 
987654 x 9 + 2 = 8888888
9876543 x 9 + 1 = 88888888
98765432 x 9 + 0 = 888888888 

कमाल आहे.. नाही? 

1 x 1 = 1 
11 x 11 = 1 2 1
111 x 111 = 1 2 3 2 1 
1111 x 1111 = 1 2 3 4 3 2 1 
11111 x 11111 = 1 2 3 4 5 4 3 2 1 
111111 x 111111 = 1 2 3 4 5 6 5 4 3 2 1 
1111111 x 1111111 = 1234567654321 
11111111 x 11111111 = 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 1 
111111111 x 111111111 = 12345678987654321
आणि आता ह्या साधर्म्याकडे जर लक्ष द्या

 आणि आता अगदी गणिताच्या काटेकोर दॄष्टीकोनातून पाहू: What Equals 100%? What does it mean to give 100%? How about ACHIEVING 100%. What equals 100% in life?
Here’s a little mathematical formula that might help Answer these questions:  
थोडं इकडे लक्ष द्या

जर
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z 
Is represented as:
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. 
तर
H-A-R-D-W-O-R- K 8+1+18+4+23+15+18+11 = 98% 
आणि
K-N-O-W-L-E-D-G-E 11+14+15+23+12+5+4+7+5 = 96% 
पण
A-T-T-I-T-U-D-E 1+20+20+9+20+21+4+5 = 100% 

Therefore, one can conclude with mathematical certainty that: While Hard Work and Knowledge will get you close, Attitude will get you there !

सदरहू पोस्ट हे आमचे मित्र श्री.राजीव वर्मा ह्यांनी शेयर केलेल्या ईंग्रजी व्हिडिओचा,मराठी स्वैरानुवाद आहे.मला तो अतिशय आवडल्याने,आपल्या मराठी वाचकां समोर तो आणण्याचा हा एक प्रयत्न. राजीवभाई मन:पूर्वक धन्यवाद.  

शुक्रवार, २५ मार्च, २०११

मास्टर स्ट्रोक

कालच्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्या बद्दल अधिक काही बोलायलाच नको. हे चित्रच पुरेसे बोलके आहे. नाही का?
मैने धो डाला !

आमच्या जस्ट निफ़्टी वरच्या सौ.सुजाथा ह्यांच्या सौजन्याने 

सोमवार, २१ मार्च, २०११

ज्याच्या त्याच्या व्यवसायाचे गणित.


 
आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात खूप काही बघत असतो,अनुभवत असतो पण त्या कडे वेगळ्या नजरेने बघण्यास आपणा कडे न वेळ असतो ना सवड.

सकाळी बस स्टॉप वर बसची वाट पाहत होतो.बस यायला बराच वेळ होता कारण आधीची बस मी स्टॉप वर येता येता समोरून गेली होती त्या मुळे आता चिंता नव्हती. त्या मुळे गर्दी कडे पाहत बसण्या शिवाय पर्याय नव्हता. तेवढ्यात माझे लक्ष तेथे काम करीत असलेल्या कॉर्पोरेशनच्या झाडूवाल्या कडे अनाहूतपणे गेले.त्याला आज त्याच्या खात्या कडुन नवीन खराटा मिळालेला दिसत होता.
आता नवीन खराटा मिळाला ह्यात खरे तर काही विशेष नव्हते पण त्याच्या दॄष्टिने ती गोष्ट मोठी होती.कारण ती त्याच्या उपजीविकेच्या करिता महत्वाची होती,आणि नंतरची १५-२० मिनीटे माझी कशी गेली ते नंतर माझे मला सुद्धा कळले नाही.

रविवार, २० मार्च, २०११

भारत -वेस्ट ईंडीज...मी गणितात नापास तर तू गणित आणि ईंग्रजी मध्ये....


मी गणितात नापास तर तू गणित आणि ईंग्रजी मध्ये.......
आजच्या आत्ता पर्यंतच्या सामन्या बद्दल आत्ता फक्त एवढेच बोलता येईल.
आपण खराब खेळलो तर वेस्ट ईंडिज फ़ार फ़ार खराब खेळली.
मात्र विजेत्या भारतीय संघाचे मना पासून अभिनंदन. 
कारण विजय हा नेहमी फक्त विजयच असतो.तो किती धावांनी,विकेट्ने मिळाला,मिळविला ह्याची नोंद फक्त रेकॉर्ड बुकात ठेवली जाते.आपल्या सारख्या सर्व सामान्य क्रिकेटप्रेमींना त्याच्याशी काही घेणे देणे नसते. तथापि,जेव्हा युवराजसिंह हा मेन स्ट्राईक बोलर म्हणुन कनव्हर्ट व्हायला सुरुवात होते तेव्हा ते कौतुकाचे नव्हे तर काळजीचे कारण बनते.  

अजुन पर्यंतचा नीरस वर्ल्ड कप

ह्याने सर्वांना आशा लाउन ठेवल्या आहेत.

पण ह्या बेजान खेळ पट्ट्या,खेळ खंडोबा करण्यात सर्वात पुढे आहेत.ताशी १४० + कि.मी. वेगाने चेंडू टाकुन सुद्धा स्पर्धेतील प्रमुख बोलर हैराण झालेले दिसतात.पांढऱ्या फटक खेळपट्ट्या नि कधी नव्हे पण का होईना निदान ह्या वेळी तरी हिरवे गार असणारे आउटफिल्ड बोलर्स साठी मात्र जीवघेणी ठरली आहेत.काही करून सामना  ५० --५० ओव्हर्स पर्यंत गेलाच पाहिजे ही प्रायोजकां साठी आय.सी.सी. ने घेतलेली दक्षता,खऱ्या क्रिकेटप्रेमीला खेळा पासून दूर नेत आहे. 

शनिवार, १९ मार्च, २०११

कोकणातील होळी उत्सव (श्रीवर्धन )

होलिकोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ........2011..........  

उत्तर भारतात साजरा केला जाणारा रंगोत्सव म्हणजेच होलिकोत्सव हा महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने खास करुन कोकणात नि उर्वरित महाराष्ट्रात अग्नि पूजनाने साजरा केला जातो.अग्नि देवतेचे स्मरण,आभार नि वाईट -साईट गोष्टींचा निषेध, तसेच, त्याग ह्या सणाच्या निमित्ताने होळी मध्ये केला जातो.खास करुन माणसाच्या मना मध्ये सदैव जागृत असणाऱ्या अहंकाराची होळी ह्या निमित्ताने व्हावी असेच ह्या सणाचे प्रयोजन तर नसावे? कारण चढ़ाओढ़,मत्सर,हेवेदावे हे आजच्या जीवन शैलिचे अविभाज्य घटक बनू पाहत आहेत.चला आजच्या सणाच्या निमित्ताने त्याची आपण सर्वजण मिळून होळी करुयात.अहंकार,मत्सराच्या बैलाला घो...............