भोज्जा

रविवार, २७ नोव्हेंबर, २०११

पुण्यातील वॉकिंगप्लाझाचे कौतुक

पुण्यातील लक्ष्मीरोड वरील वॉकिंग प्लाझाचा प्रयोग यशस्वी होत आहे अशी आजच्या वर्तमान पत्रात बातमी आहे.हा प्रयोग यशस्वी  होणार नाही  किंवा होऊ शकणार नाही असे वाटायचे खरे तर काहीच कारण नाही आणि नव्हते.कारण पोलिसी  खाते आणि अतिक्रमण खाते ह्यांनी जर ह्या पूर्वी सुद्धा,हा सध्याचा समन्वय दाखविला असता तर, खरे तर हे असले प्रयोग करण्याची  वेळ सुद्धा त्यांचे वर आली नसती.वास्तविक पाहता ह्या दोन्ही खात्यांच्या प्रचंड निष्क्रियतेतूनच सध्याची परिस्थिती उद्भवली होती आणि आहे.लक्ष्मी रोडवरील आणि तेथील फुटपाथ वरील अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण खात्याला न दिसणे आणि तेथे खरेदीला आलेल्या लोकांनी त्यांच्या गाड्यां मध्ये ड्रायव्हर बसवून ठेवून,ती वाहतुकीला अडथळा उत्पन्न होईल अशी उभी करून ठेवेणे आणि ते हि अगदी एका मागोमाग एक, अशा पद्धतीने, हे सर्व सगळ्यांना दिसत असून हि पोलिसांना ते न दिसणे हे, ह्या पूर्वीही शक्य नव्हते आणि ह्या पुढे हि नसेल.

मुळात गाडीत जर ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसला असेल,........

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

शेयर बाजार कसा चालतो ? तर असा :)

शेयर बाजार हा  समजायला,रुचायला नि पचायला तसा ही अवघड विषयच आहे,नि बाजारातील मराठी माणसाचा सहभाग पाहता शेयर बाजार नि मराठी माणसाचे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे,असे म्हटले तर तितकेसे वावगे ठरणार नाही.बाजारातील होणाऱ्या व्यवहारांची व्यवस्थित माहिती नि स्व-अभ्यास  नसेल तर येथे तुमच्या चुकीला माफी नाही,कारण येथे रोजच्या रोज दुपारी साडे तीन वाजताच तुमच्या हुशारीचे मूल्यमापन  केले जाते,आणि ते ही अगदी रोख स्वरुपात.

अर्थव्यवस्थेचे अतिरंजित प्रतिबिंब वेळे अगोदरच वेळप्रसंगी बाजारात  दिसून येते असे म्हणतात कारण ती शेयर बाजाराची खासियतच आहे.बाजाराने दुरून जरी लवंग पहिली तरी ती त्यास उष्ण पडते नि वेलदोड्याच्या नुसत्या वासानेच बाजाराला हुडहुडी भरते,हे अनिवार्य कटू सत्य आहे.रावाचा रंक नि रंकाचा राव करण्याची क्षमता ज्या व्यवसायात ठासून भरली आहे,तेथे तुमच्या गरम खिशा सोबतच तुमच्या "खरोखरच्या कणखर मानसिकतेची,स्व-अभ्यासाची येथे पदोपदी परीक्षा घेतली जाते.

धर्मराजाच्या द्यूता मुळे महाभारत घडले हे माहित असूनही,माणसामधील उपजत जुगारी प्रवृत्तीला लगाम घालणे हे केवळ अशक्य आहे.त्या मुळे सर्वसामान्य सरळमार्गी लोकांनी त्या पासून चार.... नव्हे, चाळीस हात दूर राहणे हितावह असते असे म्हणतात ते खोटे नाही.ह्या पोस्ट सोबतच्या  व्यंगचित्रात शेयर बाजारातील सट्टेबाजांची मानसिकता व त्यांचे व्यवहार हा विषय व्यंगचित्रकाराने थोडा अतिरंजित पण अतिशय खुबीने मांडला आहे.चला तो  आधी पाहून घेऊयात नि मग हा विषय फक्त "आजच्या पुरताच" थोडा अजून पुढे नेऊयात...

रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

सोनिया गांधींना ताप का आला ?

नुकताच  ९ नोव्हेंबरला  हृषीकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गाच्या पायाभरणीचा समारंभ रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी आणि संरक्षण मंत्री ए.के.अँथनी यांच्या हस्ते पार पडला.आधीच्या प्रसिद्धीनुसार  सदरहू सोहळा हा रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत सोनिया गांधींच्या हस्ते करण्याचा काँग्रेस सरकारचा मानस होता.स्थानिक वृत्तपत्रात तशी जाहिरात सुद्धा करण्यात आली.मात्र उत्तराखंडचे मुख्यमंत्री मेजर जनरल (निवृत्त) बी सी.खंडुरी ह्यांच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवलेल्या एका फॅक्सने  सोनिया गांधीना "ताप" आला,नि त्या सोहोळ्यासच  उपस्थित राहू शकल्या नाहीत.

झाले असे कि,.....

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

जे.आर.डी.टाटांचे दुर्मिळ पेंटिंग

मध्यंतरी सहजच सर्फिंग करत असता जे.आर.डी.टाटांचे  "एक दुर्मिळ पेंटिंग" पहाण्यात आले. हे चित्र म्हणे त्यांच्या रहात्या घरात ठेवले आहे.कुणा ऐक्या अनामित कलाकाराने हे पेंटिंग जे.आर.डी.टाटांना सप्रेम  भेट दिले होते.हे चित्र दिल्या वर ते नक्की कशाचे चित्र आहे हे कुणाला तसे काही उमगले नाही अशी काही ब्लॉग/साईट  वरील माहिती सांगते,आणि जे.आर.डी.ह्यांच्या निधना नंतर म्हणे त्याचे रहस्य उलगडले असे सांगतात.

तथापि ते बिलकुल पटत नाही.त्या चित्रकाराच्या ह्या अप्रतिम कलाकृतीचा पूर्ण मान राखून,असे अतिशय विश्वासाने सांगावेसे वाटते कि हि कला निश्चितच दुर्मिळ आहे तथापि अगदीच अनोखी वगैरे अशी बिलकुल नाही/नव्हती, कारण पुण्यातील "सकाळ" ऑफिस समोरील श्री आझाद मित्र मंडळाने ह्या चित्रकलेच्या पद्धतीच्या गणपतीच्या चित्राचा देखावा हा फार पूर्वी म्हणजे सुमारे १९७० ते ७५ ह्या काळात सादर केला होता.सदर मंडळाच्या विद्यमान अध्यक्षांची,श्री.अहिरे ह्यांची ह्या संदर्भात भेट होऊ शकली नाही,पण शक्य झाल्यास त्या वेळच्या त्या देखाव्याचा फोटो व त्या कलाकाराचे नाव त्या चित्रा सोबत नंतर नक्की देण्यात येईल.

सदरहू देखाव्यात त्या कलाकाराने,गणपतीचेच चित्र खाली मंचावर काढले होते आणि प्रेक्षक ते चित्र दुरून पाहणार असल्याने,आणि ह्या चित्राची मेख प्रेक्षकांच्या त्वरित लक्षात यावी ह्या हेतूने,त्या कलाकाराने स्टील रॉड ऐवजी,क्रोमियम प्लेटेड असा अर्ध गोलाकृती असा सुमारे सहा फूट उंचीचा पत्रा वापरला होता.ह्या अनोख्या देखाव्याची बातमी "सकाळ "च्या त्या वेळच्या गणेशोत्सवाच्या अंकात छापून आल्याने ,त्या काळी हा देखावा,पुणेकरांनी लांबून-लांबून येऊन बघितला असल्याचे स्मरते.

ते काहीहि  असो.सध्या आपण जे.आर.डी.टाटांचे ते दुर्मिळ पेंटिंग तर पाहूयात !