हो............ आम्हाला मुलगी हवीये,नि तेच कसे १००% बरोबर आहे हे आम्ही पुराव्याने सिद्ध करू इच्छितो.विश्वास बसत नाही नां ? मग हा घ्या पुरावा....... अगदी फोटोंसहित ..........
एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...
मंगळवार, ७ जून, २०११
रविवार, ५ जून, २०११
६ जूनचे खरे महात्म्य
चिंतातूर जन्तूने मागच्या लेखात, मनात असलेली मळमळ थोडीफार बाहेर काढली.पण ह्या ६ जूनच्या महात्म्या बाबत थोडे खोलात जाऊन बघितल्या वर फक्त नि फक्त विषण्णताच पदरात पडली.म्हणजे "ह्याच साठी केला होता, काय तो अट्टाहास ?" हा प्रश्न मनात आल्या शिवाय राहिला नाही.कारण ज्या रायगडावर महाराजांना हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक झाला होता,तिथली सध्याची एकूणच अवस्था पहाता,पुढील तीनशे वर्षांनी तेथे वास्तूरूपाने एकूणच काही इतिहास शिल्लक राहू शकेल काय ह्या बद्दल शंका आहे.आता अधिक उणे काही बोलत बसण्या पेक्षा प्रत्यक्षातच थोडे फार पाहूयात ...चला तर मग ...
शुक्रवार, ३ जून, २०११
चिंतातूर जंतू.. अर्थात डांबरट पुणेकर...
आम्ही रिटायर्ड,म्हणजे लोकांच्या दृष्टीने रिकामटेकडे,पण आमच्या दृष्टीने सर्वात जागरूक असे पुणेकर सध्याच्या "वाघ्या" नाट्या विषयीच्या गदारोळा मुळे फार नाराज आहोत.ह्या विषयातील तज्ञ, इतिहास संशोधक त्यातील सत्य-असत्य,वास्तवता-काल्पनिकता ह्याचा जरूर तो पाठ पुरावा करतील,तो महाराष्ट्र पुढे आणतील ह्यात आमच्या मनात शंका नाही.पण ह्या भानगडीत त्यांनी "आमच्या" सारख्यांचे फार "नुसकान" केले आहे.
छ्या ! पुरावे देऊन काहींनी खेळातील सगळी गम्मत घालवायचा चंगच बांधलाय राव ! हे बरोबर नाही,अस नसतं चालत.आत्ता कुठे गणगौळण संपून वगाच्या दिशेने प्रवास सुरु होणार होता नि मधेच काही लोकं सगळा खेळाच्या रंगाचा बेरंग करून टाकतात.आमच्या सारख्या रिकामटेकड्या पुणेकरांची आत्ता-आत्ता कुठे ह्या विविध गुणदर्शनाच्या प्रयोगां मुळे थोडीशी करमणूक देखील व्हायला लागली होती,नि बेजान नीरस आयुष्यात रंग भरायला लागला होता नि मध्येच काहींनी ही अशी (खरी) माहिती उपलब्ध करून सगळा रंगाचा बेरंग करून टाकला.एक तर आम्ही रिटायर झाल्या पासून हिंग लाऊन आम्हाला कोणी विचारात नाही.जुनं पुणं,आताची बिघडलेली तरुण पिढी....(हो ! म्हणजे आमच्या मते,....कारण वय झाल्यावर तसं म्हणायचा एक प्रघात असतो ) पुण्यातील वाढती गर्दी , बेशिस्त वाहतूक,वाढती महागाई,सध्याचे राजकारण ते पार लादेन-बिदेन असले अगदी नॅशनल,इंटरनॅशनल विषयसुद्धा चघळून चघळून पार चोथा झाले होते,त्या मुळे,असं कोणी काही नवीन पिल्लू आमच्या डोक्यात सोडलं कि,सर्वात प्रथम म्हणजे आम्हाला रमायला होतं! नंतर आमची तल्लख बुद्धी प्रवासाला निघते म्हणजेच चालायला लागते नि नंतर नंतर तर पळायला लागते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)