भोज्जा

रविवार, २९ मे, २०११

डोक्याचा वापर !

जेव्हा एखाद्या उपयोग योग्य उत्पादनाची उपयुक्तता एका मर्यादे पर्यंत जाऊन पोहोचते, नि त्यात काही नवीन बदल करणे काही नैसर्गिक बंधनां मुळे शक्य होत नाही आणि केवळ त्या मुळे जर त्या उत्पादनाचा खप, खरे तर गरजेचा असूनही एका सॅच्युरेशन पॉइन्ट पर्यंत जाऊन पोहोचत असेल ,नि त्यात आता काही नवीन सुधारणा करणे शक्य नाही असे वाटत असतानाच कुणाच्या तरी डोक्यातून अफलातून कल्पना बाहेर येते नि त्या जुन्या उत्पादना मध्येच नाविन्य निर्माण होते.हेल्मेट हि वस्तू त्या पैकीच एक.आता  ह्या हेल्मेटच्या खालील चौदा प्रकारां मधून सर्वात जास्त नाविन्यपूर्ण अशी कोणती हेल्मेट निवडायची ह्या साठी सुद्धा आपल्याला पुन्हा डोक्याचाच  वापर करावा लागणार !:)  

शुक्रवार, २७ मे, २०११

उंटा(वर)चे शहाणपण !

ही एक अतिशय सरळ, साधी,अगदी छोटीशी अशी चित्ररूप गोष्ट आहे,पण ह्या छोट्याशा गोष्टीत सुद्धा, आपल्या पैकी काहींना, कदाचित, विचार करायला भाग पडण्या साठी,खूप काही अर्थ दडलाय ...



बुधवार, २५ मे, २०११

कैच्या कै !


कधी कधी एखादा दिवस असा उजाडतो कि त्या दिवशी नक्की कळत नाही कि आज काय-काय कामं हाता वेगळी करावीत... !  का नुसतं नेट वरच  बसावं... ते ! थोडक्यात आळसटलेली भंजाळावस्था ..... :)  
 
Can you Drag > From आ  to ?

रविवार, २२ मे, २०११

कनीमोझीचे फेस(फेक)बुक अकौंट

तामिळनाडू  मध्ये हे अकौंट सध्या फारच चर्चेचा विषय होऊन बसले आहे,अगदी काल्पनिक असले तरी.खरं तर तमिळ भाषेत कनी म्हणजे गोड..किंवा मधुर... नि एकूण अर्थ बहुदा "मधुरा" असा काहीसा आहे . त्या वरून हिच्या नावांत  गोडवा तर आहे, पण वास्तवात मात्र लोकांना तो सध्या फारच कडवट लागतोय.फार  सिरीयस  होऊ नका,पण करुणानिधींच्या मुलीचे म्हणजेच kanimozhi चे  तिच्या वरच्या अति प्रेमा मुळे किंवा द्रमुक वरील अती निष्ठेमुळे बनविलेले हे काल्पनिक तसेच खोटे फेसबुक  अकौंट आहे पण तामिळनाडू मधील जनता काय किंवा देशातील जनता काय सध्या काय विचार करते आहे त्याचा हा मासलेवाईक नमुना  आहे..   आपण मराठी वाचक निदान एक करमणूक म्हणून तरी त्या कडे पाहूयात.चला तर मग...

शुक्रवार, २० मे, २०११

त्या "चपट्या" नाकवाल्याची गोष्ट

खरं तर हे चपट्या नाकाचं, लहानसं, एक अगदी सर्वसाधारण कुत्र्याचं पिल्लू होतं,म्हणजेच "पग".मात्र, लोक त्याला "हच डॉग" म्हणूनच  ओळखायचे. ते छोटंसं  पिल्लू असताना त्याचे आयुष्यं खूप मस्तं चालले होते.एकदम आनंदात.
 खायचं,प्यायचं, खेळायचं नि झोपायचं ...... 

बुधवार, १८ मे, २०११

अजितदादा पवार.. एक (काल्पनिक) चित्रकथा.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमुळे सध्या अजितदादा पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.खरे तर "काँग्रेसी संस्कृतीत फिट्ट न बसणारे असे जे " ते अजितदादा असे त्यांचे वर्णन केले तर ते फारसे चुकीचे नसेल.कारण  कुठल्याही पण त्यातल्या त्यात अडचणीच्या गोष्टीवर कधीच कुठलीही प्रतिक्रिया न देणे,त्वरित तर त्याहून नाही अशी काँग्रेसजनांची  खरे तर ख्याती आहे.अडचणीची ती गोष्ट किंवा तो मुद्दा अशा पद्धतीने लळत-लोंबकाळत ठेवायचा कि नंतर तो आपोआप बाजूला पडतो नि लोकं देखील कालांतराने तो विसरतात,हे वरवर दिसायला अतिशय साधे पण अंमलात आणायला अतिशय कठीण असे टेक्निक वारंवार पण अतिशय खुबीने काँग्रेसजन  वर्षानुवर्षे वापरत आले आहेत.तथापि अजितदादा मात्र त्याला अपवाद आहेत.ते त्वरित रीअँक्ट होतात अन मिडीयाला आयतेच खाद्य मिळते.तसे दादा ह्या प्रकरणा व्यतरिक्त सुद्धा ह्या ना त्या निमित्ताने तसे चर्चेत होतेच,अन त्यांच्या काकांना,म्हणजेच शरद पवारांना  मधे-मधे  हस्तक्षेप करणे भाग पडायचे.

पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागे लाऊन दिलेल्या ह्या बँकेच्या प्रकरणांमुळे ते फारच अडचणीत आले आहेत,त्या मुळे माझ्या सारख्या  सामान्य नागरिकाच्या मनात खालील कपोलकल्पित चित्र उभे राहिले.सगळी व्यक्तिमत्वे हि खूपच मोठी असल्याने त्यांचे सर्व भावमुद्रा असणारे त्यांचे वेगवेगळ्या प्रसंगी घेतलेले,काढले गेलेले फोटो गुगल इमेज मध्ये सहजगत्या उपलब्ध असतात/आहेत ते  केवळ मी माझ्या बालबुद्धी प्रमाणे संकलित करून,त्यात काल्पनिक संवाद घालून हे पोस्ट तयार केले आहे,अर्थातच त्याचा वास्तवाशी काही एक संबंध नाहीये हे आपणां सारखे सर्व सुज्ञ वाचक जाणतातच.पण झाल्या प्रकार बद्दल सामान्य नागरिक अगदी बाकी काही नाही तर ह्या प्रकारा कडे  थोड्या विनोदी  नजरेने  तर पाहू शकतोच ना ?  तुम्हाला काय वाटतंय ते  पाहून तुम्ही ठरवालच  म्हणा !

सोमवार, १६ मे, २०११

पेट्रोल दरवाढ...व्यंगचित्र रूपाने

आताशा पेट्रोलची दरवाढ हा विषय खरे तर अनपेक्षित किंवा धक्कादायक वगैरे बिल्कुल राहिलेला नाहीये.आंतर्राष्ट्रीय बाजारातील पेट्रोलची वाढती किंमत,देशांतर्गत पेट्रोकेमिकल कंपन्यांची वाढती वित्तीय तूट ह्या वास्तवाचा केवळ तत्कालीन सरकारने पुरेशी खबरदारी घेऊन जर योग्य वेळी सामना केला नाही तर ह्या गोष्टी अपरिहार्य असतात.खरे तर प्रत्येक पक्ष हा प्रथम सत्ता मिळविणे नि नंतर ती टिकविणे ह्यासच प्राधान्य देत असतो,त्या मुळे वित्तीय तुटीचा जेव्हा अगदी कडेलोट व्हायची वेळ येते तेव्हा हे कटू निर्णय हे घ्यावेच लागतात.आपण सर्व सामान्य जनता हि भाबडी(बावळट),निरागस (मूर्ख) असल्याने ह्या दरवाढीस सरकारच्या सांगण्या नुसार "फक्त" आंतर्राष्ट्रीय बाजारातील पेट्रोलच्या  वाढत्या किंमती वर अज्ञाना पोटी विश्वास ठेवून मोकळे होतो,नि सरकारी यंत्रणेच्या योग्य वेळी योग्य निर्णय क्षमतेच्या नाकर्तेपणा मुळेच होणारी वाढती वित्तीय तूट,त्या मुळेच वाढणारा महागाई दर वगैरे सोयीस्कररित्या  विसरून जातो. चला तर मग ह्या वेळी सुद्धा तेच करू... फक्त व्यंगचित्र रूपाने

शनिवार, १४ मे, २०११

बंगाली जादू

मुळात प.बंगाल मधील राजकारण हे फक्त आपल्यालाच नव्हे तर उभ्या भारताला न उलगडलेले कोडे आहे.वर्षा नु वर्षे  ....नव्हे दशकानुदशके  राज्यात कम्युनिझमच्या नावा खाली कोणतेही मोठे उद्योग उभारू द्यायला स्वतःच  विरोध करणारे असे जे कुप्रसिद्ध सरकार ते कम्युनिस्टांचे अशी ज्याची ओळख होती  ते सरकार मुळात इतके वर्ष  अमर्याद सत्ता उपभोगू शकले हा भारतीय लोकशाहीतील एक मोठ्ठा विनोद आहे.फार पूर्वी तेथे हल्दिया ग्रुपचे नि आत्ता लेटेस्ट टाटा ग्रुपचे  जे दिवाळे नि वाभाडे निघाले,ते कोणताही उद्योजक अगदी ठरविले तरी सहजा सहजी विसरू शकणार नाही.नॅनोला प.बंगाल मधून घालवितांना  ममता बाईंनी,अगदी नावात जरी ममता असली तरी वागण्यात नि बोलण्यात जो क्रूरपणाचा कळस गाठला होता,त्याला तोड नाही.मुळात वर्षानुवर्षे केंद्रातील कॉंग्रेसला तेथे असलेल्या अल्प जनाधारा ,प्रतिसादा मुळे तेथे त्यांचे सरकार नसल्याने कोणतीही समाज उपयोगी योजना राबविणे कधीच आवडत नव्हते नि साम्यवादाची घोंगडी पांघरलेले मा.क .प.चे सरकार सुद्धा निवांत झोपत होते.ह्या सगळ्या पार्श्व भूमीवर तेथील जनते पुढे हतबल होण्या शिवाय पर्यायाच नव्हता.राज्यातील बहुसंख्य गरीब, अशिक्षित नि निर्बुद्ध जनतेच्या जीवावर तीच ती लोकं वर्षानुवर्षे निवडून येत होती नि सत्तेचे लोणी चाखत होती.

सोमवार, ९ मे, २०११

"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा "अनुभव"

"कोई चुपके से आ के, सपने सुला के,मुझ को  जगा के बोले.... कि मै आ रहा हूँ !  कौन आये,ये मै कैसे जानू ? "  वा ! काय कमालीचे शब्द आहेत.अहो  असे अर्थपूर्ण नि आशयघन शब्द गीता दत्त साठी  फ़क्त कपिल कुमारच लिहू शकतो. तो सत्तरीचा काळच काही वेगळा होता कि असे नि ह्या प्रकारचे किती तरी ओघवते काव्य त्या वेळी रसिक श्रोत्यांच्या कानावर येऊन ठेपत असे.खरे तर त्याचे रसग्रहण करण्याची नीटशी संधी सुद्धा त्या काळी त्या पिढीला मिळाली नाही.कारण उत्तमात उत्तम आंबेमोहोर अगदी मुबलक पणे बाजारात मिळत असेल तर अगदी बासमती सुद्धा क्षणभर बाजूला पडतो  नि रेशनच्या जाड्या भरड्या तांदळा साठी  तर कोण कशाला रांग लावेल असा तो काळ..... त्यां मुळे इतकी अर्थपूर्ण नि रसाळ काव्ये तेव्हा गाण्यांच्या रूपाने इतकी लागोपाठ रसिकां समोर यायची कि त्यात सुद्धा नाईलाजास्तव थोडे  डावे उजवे करावे लागायचे.,नव्हे आपोआप व्ह्यायचे.
आज ह्या गोष्टीची आवर्जून आठवण व्हायचे कारण म्हणजे सकाळीच न्हाव्याकडे कटिंगला गेलो असता "लोकसत्ताची" लोकरंग पुरवणी वाचनात  आली.तसे आमचे पवार सलूनवाले सुद्धा रसिकच,त्या मुळे बोलबोलता विषय निघाला नि थेट ७० सालात जाऊन पोहोचलो.आजच्या लोकरंग मध्ये ह्या गाण्या विषयी वाचनात आले नि तो सुवर्ण काळ आठवला.

शनिवार, ७ मे, २०११

लता मंगेशकर अन कॅबेरे साँग

S S जाने S जा......

लता मंगेशकर अन कॅबेरे साँग म्हणजे भांगेत तुळस..... नव्हे, खरं तर तुळशीत भांग. कारण  लताच्या वाट्याला हिंदी सिनेमाच्या  ७० च्या दशकात  "कॅबेरे डान्स साँग " म्हणजेच खास करून हेलेन वर चित्रित झालेली गाणी तशी कमीच  आली.मध्यंतरी खुद्द लताने सुद्धा हे स्वतः एका मुलाखतीत बोलून दाखविले.कारणे भले काहीही असोत पण १९६९ साली येऊन गेलेल्या संजय (हा त्या काळी पुढे खान हे आडनाव लावत नसे)साधना,अशोककुमार नि हेलेनच्या "इन्तकाम" मधील राजेंद्र कृष्ण लिखित नि लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीने संगीतबद्ध केलेले हे "कॅबेरे साँग" त्यास अपवाद आहे.गाण्याच्या सुरुवातीस हेलेनने ज्या नजाकतीने नि अदाकारीने तिच्या कंबरेचा नि शरीरसौष्ठवाचा वापर ह्या गाण्यात केलाय त्याला तोड नाही.अहो, मुळात आ जाने जा म्हणून ती आव्हानच देतीये त्या मुळे गाण्यातील ज्येष्ठ (दिवंगत)अभिनेता असित सेनच्या तोंडाला लाळ सुटली नसती तरच नवल होतं :)  शेवटी हेलेन ती हेलेनच तिला तोड नाही .....आणि नसेल हि..... 

बुधवार, ४ मे, २०११

लादेन... किती खरा नि किती खोटा ?

ओसामा संपला पण नेहमी प्रमाणे बरेच प्रश्न अनुत्तरीत ठेवून.खरं तर मराठी नि हिंदी सिरीयलचे आम्ही हक्काचे प्रेक्षक ह्याला आता चांगलेच सरावलो आहोत  कि असे बिनडोक प्रश्न आम्हाला आता सहसा पडत नाही. पण इथे कसं डायरेक्ट लादेन आहे नि लादेन बाबत अगदी खुद्द अमरिकेने नव्हे खुद्द ओबामाने जरी  अगदी आमच्या वर त्याची किंवा त्याच्या देशाची हि कृती  लादेन असं जरी सांगितलं तरी आम्ही ती सहजा सहजी लादून घेणार नाहीये. काही बेसिक, भाबडे म्हणजेच बावळट असे प्रश्न हे पडतातच. मुळात तो खरच संपला का ? का संपला असे सांगून अमेरिकेने  नेहमी प्रमाणे स्वतःची एकदाची सुटका करून घेतली ? कारण कुणी म्हणत तो निःशस्त्र होता तर कुणी म्हणत कि त्याच्या कडून  प्रतिकार झाल्याने त्याला गोळ्या घातल्या. आता जर तो निःशस्त्र होता  नि अगदी नेम धरून त्याच्या डोक्यात गोळ्या घाले पर्यंत जर जवळ जाता येत होते तर त्याला जिवंत पकडता का नाही आले ?त्या सद्दाम हुसेन सारखा ? नि इतक्या घाई घाईने त्याला समुद्रात का फेकले ? का हि सुद्धा एक फेकच आहे का खरा लादेन कदाचित पूर्वीच मेला असेल वा नसेल पण केवळ या  विषयावर कायमचा पडदा टाकण्या साठी  हे अमेरिकेचे नेहमी प्रमाणे एक नवे पण नेहमी प्रमाणेच बेमालूम नाटक  आहे

अहो, आमच्या वाड्यात अगदी बोहारीण जरी भां S डी SS ...ये करत शिरली तरी ती कुणाच्या दारा समोर उभी राहून आवाज देतीये हे शेजारच्या काकू हातातलं काम सोडून बघतात नि इथे तर अनोळखी देशाची ४-४ हेलीकॉप्टर  रात्री बेरात्री विनापरवानगी एखाद्याच्या प्रदेशात उतरतायेत, ३०-४० मिनिट आमच्या हिंदी सिनेमातल्या प्रमाणे फुल फायटिंग करतायेत नि शत्रूचा खात्मा करून भुरकन पुन्हा उडून जाताहेत.अन ते सुद्धा म्हणे त्या आय.एस.आय च्या तळाच्या फक्त ७०० मीटर अंतरावर.सगळेच संशयास्पद.एक कुणी १०-१२ वर्षाचा मुलगा काही सांगतो नि आपण आपले तोंडाचा आ करून बघत राहायचे ? बरं, फोटो दाखवून टी.व्ही. न्युज चॅनल वाले ज्याला अलिशान- आलिशान हवेली म्हणून संबोधतायेत ते घर तरी कसले डोंबलाचे अलिशान ?कुठल्या तरी एन्गलने ते अलिशान वाटते का?अहो आमच्या कडच्या सरपंचाचे घर त्या पेक्षा अलिशान असते नि सर्वात महत्वाचे म्हणजे ते  दिसते.का लोक पहातेहेत नि ऐकताहेत म्हणून हुं म्हणून काहीही रेटत रहायचं ?  
मुळात एखाद्या गोष्टीचे उत्तम प्रेझेन्टेशन करण्याचे अमेरिकेचे कौशल्य वादातीत आहे.अगदी चंद्रावर माणूस उतरला पासून ते इराक मध्ये सद्दाम हुसेनने केमिकल वेपन्स ठेवली आहेत ते वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडण्या -पडण्या पर्यंत.मागे ७० च्या दशकात अमेरिका-रशियाच्या त्या कोल्डवॉरच्या काळात चंद्रावर तो आर्मस्ट्रोंग उतरला काय नि न उतरला काय त्याने इथे कुणालाच फरक पडणार नव्हता. आमचा भुगोलातला तो अवघ्या २ मार्कांचा प्रश्न.  पण अगदी बेंबीच्या देठापासून शंख केलेल्या सद्दाम बाबत ही सरते शेवटी हाती काहीच लागले नाही ना? ना केमिकल वेपन ना अजून काही.तो सद्दाम सुद्धा शेवटी एखाद्या अगदी हुतात्म्या सारखा फासावर गेला.अहो  तिथली बहुसंख्य जनता अजून ही बऱ्या पैकी   मागासलेलीच होती नि आहे.नाही तर हां सद्दाम  दशाकानुदशके तेथे सत्ता उपभोगु शकला असता का ? का अमेरिका नि ब्रिटन ला येनकेंन  प्रकारे संपत चाललेल्या जगातील तेलसाठ्याची जी चिंता भेडसावत होती त्या वर जगाची सहानुभूति मिळवून,बघा आम्ही होतो म्हणून तुम्ही वाचलात हे उपकार केल्याचे दाखवून त्या वर फ़क्त ताबा मिळवायचा होता? हे प्रश्न अनुत्तरितच आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर बाबत सुद्धा बरेच प्रश्न अनुत्तरितच आहेत.हेरम्ब ओकच्या ह्या पोस्ट  मुळे तर त्यास पुष्टीच मिळते.त्या मुळे अगदी जरी खरोखरचा लादेन मारला गेला असे जरी आपण मान्य केले गृहीत धरले तरी हे एनकौंटर  म्हणजे  नेहमी प्रमाणे दर ४-६ महिन्याने टी.व्ही. वर येणारया त्या लादेनच्या टेपला आता हे अमेरिके कडून कायमचे उत्तर देऊन त्याला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न आहे का ? ह्या नंतर सुद्धा अमेरिके कडून ह्या विषायावर बरेच उलट सुलट दावे बातम्या येतंच रहातील पण  आम्हां सामान्यांचा बुद्ध्यांक मुळातच कमी असल्याने असे प्रश्न मग ते कदाचित बिनबुडाचे सुद्धा असतील पण पडू शकतात नि मुळातच हुशार नसल्याने अगदी स्टॅटिस्टीकली ते मांडून त्याचा शहानिशा सुद्धा करू शकत नाही. कां लादेन संपला हे ही नेहमी प्रमाणेच उत्तर नसलेले कायमचे  कोडेच   राहणार आहे.       


रविवार, १ मे, २०११

“शेवटचं पान”

ही  गोष्ट आहे अमेरिकेतली. १८९० च्या सुमारास न्यूयॉर्क शहरातील ग्रीनविच व्हिलेज मध्ये बरेच कलाकार वास्तव्यास असायचे. स्यू  आणि जोन्सी ह्या दोघी त्या पैकीच एक. अगदी पहिल्यांदा त्या दोघी एकमेकींना जेव्हा  तिथल्या एका रेस्टाँरंट मध्ये भेटल्या,तो त्यां वर्षीचा मे  महिना होता.
मी मेन स्टेट मधून आलेय नि मासिकांच्या कथांसाठी  चित्रे काढून देते.
स्यू ने आपली ओळख करून देत जोन्सीला  सांगितले.
"आणि मी कॅलीफोर्नियाची, पण खरे तर मला मनातून इटलीला जायची  खूप इच्छा आहे.नि तेथे जाऊन  बे ऑफ नेपल्सची खूप चित्रे काढायची ईच्छा  आहे."
जोन्सी उत्तरली.
त्या दिवशी त्या दोघींची ती पहिलीच भेट असून सुद्धा  अगदी पहिल्या भेटीतच दोघींचे सूर असे काही जुळले कि त्यांनी त्यांच्या कला ह्या विषया बरोबरच अगदी कपडे, ड्रेस, खाण्यापिण्याची आवड निवड ह्या विषयावर सुद्धा मनसोक्त गप्पा मारल्या.