भोज्जा

बिग बॉस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बिग बॉस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० ऑक्टोबर, २०१०

बिग बॉसचा खेळ बंद. म्हणजे माझ्या कडून.

मित्रांनो वाटल नव्हत कि हि वेळ इतक्या लवकर येईल म्हणून.पण नाईलाज झाला.शेवटी आपल्या वेळेला सुध्धा काही किंमत आहे कि नाही?संयुक्तिक कारणे खालील प्रमाणे.

१) खेळाडूंच्या चुकीच्या निवडी मुळे खेळातील गम्मत सुरुवाती पासूनच हरवलेली.
२) बोजड चेहऱ्याच्या लोकांचे चाळे बघण्यात काहीच स्वारस्य नसते.
३) जवळपास प्रत्येक जण स्वतःच्या केलेल्या चुकांची सारवासारव करण्यासाठी आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कफल्लक अवस्थेतून बाहेर पडण्याच्या धडपडी मुळे येथे येऊन धडपडल्याचे त्यांच्या बोलण्यातूनच समजले.नमुन्या दाखल खालील उदाहरणे घेऊ.
४) वीणा मलिक ... जो काही थोडा फार पैसा तरुणपणी मिळवला होता तो अक्कल मातीत गेल्याने व्यसनी असिफ वर उधळल्याने हिला स्वतःला येथे उधळावे लागले.
श्वेता तिवारी .... राजा चौधरीची हिने केलेली निवड चुकल्याचे हिला मुल झाल्यावर लक्षात आले.आता वेळ निघून गेली त्या मुळे मुलीचे नि स्वतःचे पोट निस्तर्याण्याची जबाबदारी इलाज असो व नसो सांभाळणे भाग पडतेय.वेळ प्रसंगी ह्याच पद्धतीच्या दुसर्या शो मध्ये केले तसे उघडे नागडे अंग प्रदर्शन करावे लागले तरी हरकत नसलेली.
पटेल ....... MMS कांडा मुळे फिल्मी करिअर तर बरबाद झाले आहेच पण रडून भागून काही कामे मिळाली तर एक शेवटचा प्रयत्न म्हणून आलाय.कारण बहिण तर सिनेमा क्षेत्रातून कधीच हद्दपार झालीये.

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

बिग बॉसचा खेळ सुरु

काल पासून बिग बॉसचा खेळ पुन्हा सुरु झाला.ह्या वेळी फक्त टेस्ट व्हेन्यू बदलला म्हणजे सोनीच्या ऐवजी कलर.ह्या वेळचे खेळाडू पाहता खेळ रंगण्या साठी ज्या आवश्यक गोष्टी लागतात त्याची निदान आत्ता तरी खूपच कमतरता वाटते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे खेळाडूंचे सरासरी वय.खरे तर टी आर पी वाढविण्यासाठी ते सरासरी २५ ते २७ -२८ असणे एवढेच गरजेचे आहे.ह्याचा फायदा म्हणजे एक तर आयुष्याचा त्या तुलनेत कमी असलेला अनुभव,सळाळते रक्त,तारुण्य सुलभ भावना,थोड्या सहवास नंतर सुध्धा एकमेका बद्दल वाटू शकणारे आकर्षण,बेडरपणा,तापटपणा क्वचित प्रसंगी अपरिपक्वपणा ह्या सगळ्या खरे तर हा खेळ रंगण्यास कारणी भूत ठरणाऱ्या गोष्टी आहे.