भोज्जा

बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

गुरूची विद्या गुरूला

प्रसंग १९७३ चा आहे.तामीळनाडू दौर्यावर पंतप्रधान इंदिरा गांधी  शंकराचार्यांच्या कांची मठात गेल्या.

मठातील सर्वांनी स्वागत करून त्यांना शंकराचार्यां कडे नेले.

 १ तासभर इंदिराजी व शंकराचार्य एकमेकां समोर बसले , पण दोघे ही एकमेकांशी एकही शब्द बोलले नाहीत.

तासाभराने इंदिराजींकडे पहात छोटेसे स्मितहास्य करून शंकराचार्य आतमधे निघून गेले.

निराश होत इंदिराजी तेथून निघून गेल्या. दुसर्या दिवशी  वर्तमानपत्रात ही बातमी हेडलाईन होती.

नंतर पत्रकारांनी शंकराचार्यांना विचारले कि स्त्रीपंतप्रधान असल्याने तुम्ही इंदिराजींशी असे वागलांत कां ?  पंतप्रधान म्हणून इंदिराजी त्यांना आवडत नाहीत कां ?

मात्र यावर शंकराचार्यांनी पत्रकारांना जे सांगीतले ते ऐकून सगळे चकित झाले.

शंकराचार्य म्हणाले,  मागे मी हिंदू  धर्मादाय निधी खाते ( HR & CE Department ) या मिनिस्ट्रीला  संबोधून पंतप्रधान कार्यालयाशी , हिंदू देवळांशी संबंधित असलेल्या अडचणीं विषयी जेव्हा पत्रव्यवहार केला , तेव्हा पंतप्रधानांना या विषयासंबंधित चर्चेस मला वेळ नसल्याचे कळविले.

त्या काल येथे आल्यावर , मठाधिपती म्हणून मला त्यांच्याशी हा विषय वगळता त्यांच्या खाजगी किंवा राजकीय आयुष्या विषयी बोलण्यांत कुठलेच स्वारस्य नव्हते आणि हिंदू धर्म धर्मादाय निधी ,हिंदू देवळांच्या अडचणीं या विषयाची चर्चा करण्यांस त्यांना वेळ नाही...मग अशा वेळी मी काय करणे अपेक्षित होते असे तुम्हांला वाटते ?

तात्पर्य : डॉक्टर्स नेहमी पेशंटचा रोग पाहून उपचाराची दिशा ठरवतात....😜🙈😉



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा