भोज्जा

सोमवार, ९ जानेवारी, २०१२

"पुण्याचे निरक्षर नगरसेवक "

"केवळ ६६ नगरसेवकांनाच पडले प्रश्न" ह्या मथळ्या अंतर्गत "दै.सकाळ " पुणे आवृत्तीत नुकत्याच ३ जाने.ला आलेल्या बातमी नुसार गेल्या ५ वर्षात, जून २००७ ते डिसेंबर २०११ ह्या कालावधीत मावळत्या महापालिके मध्ये निवडून आलेले १४४ नगरसेवक आणि ५ नामनिर्देशित सदस्य अशी १४९ संख्या होती/आहे.ह्या ५ वर्षात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ह्या एकूण १४९ सदस्यांपैकी  निम्म्याहून अधिक नगरसेवक/सेविकांनी त्यांच्या विभागा मधील कोणत्याही विकास कामाबद्दल,सुधारणे  बद्दल कधीही कोणताही लेखी प्रश्न उपस्थित केला नाही.थोडक्यात त्यांनी त्यांच्या ह्या अधिकाराचा कधी वापरच केला नाही,किंवा त्यांना शहरा  बद्दल किंवा  त्याच्या विकासकामा बद्दल कधी कोणता प्रश्नच पडला नाही.
खरे तर महापालिका अधिनियमानुसार नगरसेवकांना नागरी सुविधा ,विकास कामे,योजना आदि संदर्भात सर्वसाधारण सभेत असे लेखी प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. दर महिन्याच्या सर्वसाधारणसभेत हे प्रश्न मांडता येतात.हे प्रश्न फक्त नगरसचिव कार्यालयात त्यांना आधी दाखल करावे लागतात व तो प्रश्न सर्वसाधारण सभेत घ्यावा कि न घ्यावा ह्याचा निर्णय महापौर घेतात.मात्र सर्वसाधारणपणे बहुतेक सर्व प्रश्न सर्वसाधारण सभेत चर्चेला ठेवले जातात असा अनुभव आहे.लेखी प्रश्नांच्या आधारे प्रशासनावर अंकुश ठेवण्यास मदत होत असते,हा त्या मागचा मुख्य हेतू ...त्यातील गमतीचा अजून एक भाग म्हणजे ह्या ६६ नगरसेवकांपैकी  काही नगरसेवकांनी केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सुद्धा केवळ नावालाच प्रश्न विचारले होते असे हि निदर्शनास आले आहे....  

पण ह्यात त्या माननीय(?)नगरसेवक/सेवकांची काहीही चूक नाही .....  आणि त्यातून जेव्हा पुण्यातील ५०% नगरसेवक कोण असावेत हे जेव्हा झोपडपट्टीवासीय ठरवितात/ठरविणार आहेत तेव्हा तर हि औपचारिकता पूर्ण केली काय किंवा न केली काय सर्व सारखेच.त्या साठी कृपया सोबतचा खालील तक्ता  पहावा {सौजन्य:पुणे स्लम एटलास आणि दै,सकाळ )  

प्रभागनिहाय लोकसंख्या
     प्रभागांची संख्या             झोपडपट्टीमधील लोकसंख्या    

  1. ३                             १०० टक्के  
  2. ३                             ७६ ते ९९ टक्के  
  3. १२                          ५१ते  ७५  टक्के  
  4. १८                          २६ ते ५०  टक्के   
  5. ३२                          १   ते २५   टक्के  
  6. ८                                       0    टक्के
चर्चेने कोणता प्रश्न सुटू शकतो ह्या वर आत्ताच्या काळात खुद्द जेथे  जगभराच्या संसदे मधील सभासदांचा  विश्वास उडत चाललाय  तेथे पुण्यातील नगरसेवकांनी केवळ मूक-निरक्षर राहणे पसंत केले हे खरे तर त्यांनी पुणेकरांवर केलेले अनंत उपकार होय. विश्वास बसत नाही ना ? मग हा घ्या फोटोरुपी पुरावा.....अगदी भारताच्या संसदे पासून ते पार चीनच्या संसदे पर्यंत....शेवटी कुठे हि गेलात तरी पळसाला पाने तीनच...पण हि परिस्थिती कधी तरी बदलेल का ???
 
  भारत  
 

    इटली  

    जपान 

  मेक्सिको 

  रशिया  

  दक्षिण कोरिया 

  तैवान  

  टर्की


  युक्रेन 

आणि हे १९६२ च्या ह्यांच्या बरोबरच्या युद्धामुळे आपल्याला माहिती झालेले शांतताप्रिय(?),गोड(?) स्वभावाचे चीनी  !
 पोस्ट सौजन्य सौ.सुजाता आणि ती मूळ अनामिक साईट नि ते छायाचित्रकार ; धन्यवाद  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा