भोज्जा

रविवार, १० ऑक्टोबर, २०१०

बिग बॉसचा खेळ बंद. म्हणजे माझ्या कडून.

मित्रांनो वाटल नव्हत कि हि वेळ इतक्या लवकर येईल म्हणून.पण नाईलाज झाला.शेवटी आपल्या वेळेला सुध्धा काही किंमत आहे कि नाही?संयुक्तिक कारणे खालील प्रमाणे.

१) खेळाडूंच्या चुकीच्या निवडी मुळे खेळातील गम्मत सुरुवाती पासूनच हरवलेली.
२) बोजड चेहऱ्याच्या लोकांचे चाळे बघण्यात काहीच स्वारस्य नसते.
३) जवळपास प्रत्येक जण स्वतःच्या केलेल्या चुकांची सारवासारव करण्यासाठी आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कफल्लक अवस्थेतून बाहेर पडण्याच्या धडपडी मुळे येथे येऊन धडपडल्याचे त्यांच्या बोलण्यातूनच समजले.नमुन्या दाखल खालील उदाहरणे घेऊ.
४) वीणा मलिक ... जो काही थोडा फार पैसा तरुणपणी मिळवला होता तो अक्कल मातीत गेल्याने व्यसनी असिफ वर उधळल्याने हिला स्वतःला येथे उधळावे लागले.
श्वेता तिवारी .... राजा चौधरीची हिने केलेली निवड चुकल्याचे हिला मुल झाल्यावर लक्षात आले.आता वेळ निघून गेली त्या मुळे मुलीचे नि स्वतःचे पोट निस्तर्याण्याची जबाबदारी इलाज असो व नसो सांभाळणे भाग पडतेय.वेळ प्रसंगी ह्याच पद्धतीच्या दुसर्या शो मध्ये केले तसे उघडे नागडे अंग प्रदर्शन करावे लागले तरी हरकत नसलेली.
पटेल ....... MMS कांडा मुळे फिल्मी करिअर तर बरबाद झाले आहेच पण रडून भागून काही कामे मिळाली तर एक शेवटचा प्रयत्न म्हणून आलाय.कारण बहिण तर सिनेमा क्षेत्रातून कधीच हद्दपार झालीये.

राहुल भट ...... दोन वेळच्या मम्मचे तसे वांदे नसले तरी बापाच्या पुण्याईवर अजून किती वर्षे जगणार त्यातून हेड्लीचे शेण खाऊन ठेवलेय ते निस्तरतोय.
साक्षी प्रधान ..... एम टी वी वरच्या कार्यक्रमात जे रंग उधळले त्या मुळे बहुदा घरच्यांनी हाकलून दिले असावे त्या मुळे मोकाट सुटलेली गाय.
सीमा परिहार .... बिचारीला अजून स्वतःलाच कळले नाही कि ती इथे का आली?
समीर ...... आता ४२-४३ व्या वर्षा पर्यंत काहीच जमले नाही तर निदान चुकून माकून जमलेच तर राहुल रॉय सारखी लॉटरी लागतीय का हे चाचपून पहातोय.
सारा ..... हिला आधी बाजूला सारा.खर तर ह्या पोरीविषयी( म्हणजे असेल तशी बाईच पण हिच्या अंगचणी मुळे किंवा कुपोषणामुळे अजून कितीही वर्षांनी बघितली तरी नि शाळेचा फ्रॉक घालून समोर आली तर शाळेतलीच वाटेल अशी)रडकी.हिला बहुदा हिच्या मित्राने "झाला झटका तर झाला" ह्या हेतूने हिची शेपटी पिरगळून येथे सोडले असावे.
अली..... हि, हा आला काय नि गेला काय.सरड्याची झेप फक्त कुंपणा पर्यंत.
ती बोळक्या तोंडाची कोण ती मॉडेल जणू काही आपण आभाळातून पडलोय नि हिंदी पहिल्यांदाच एकतोय असंच भासवत नॉमिनेशन पासून गुपचूप दूर राहायचा प्रयत्न करते.एकजात लबाड साले.
आणि शेवटचा तो पारोश्या राहिला.आत्ता त्याच नाव सुध्धा आठवत नाही,सदान कदा काही तरी चघळत चघळत बोलताना घाणेरड्या पद्धतीने ते पुढे आणतो.किळसवाणा प्रकार अन दुसर काय?


विशेष म्हणजे हे फक्त दोन किंवा अडीच एपिसोड बघून झालेले मत आहे.त्यातून सलमानचा कहर.बिचारा ४५ व्या वर्षी सुध्दा शिंग मोडून वासरात शिरायचा प्रयत्न करतच असतो.दबंग म्हणे हिट झालाय त्या मुळे मोकाट सुटलाय.ह्या वर्षातले निकृष्ट दर्जाचे एन्कर म्हणून काही प्राईज असल्यास लगेच देऊन टाकू.

थोडक्यात काय अक्कल शेण खायला गेली नि बिग बॉस चे का होईना पण अडीच एपिसोड तरी बघायचं पाप पदरी पडल ते पडलंच.अब बुंद से जो गई वो हौद से नही आयेगी ये हम जानते है!कम से कम देर से आए लेकिन दुरुस्त आए!तेवढीच कबुली दिल्याने थोड हलक वाटेल.

३ टिप्पण्या:

  1. आज खूप दिवसांनी सहज हे माझेच पोस्ट मी परत वाचले नि जाम खुश झालो कारण खूप दिवसांनी आज पुन्हा एकदा बिग बॉसचा शो पाहण्यात आला नि फक्त अडीच एपिसोड बघून माझे ह्या शो बद्दलचे जे मत झाले होते ते किती बरोब्बर होते ह्याची अनुभूती आली.असो.

    उत्तर द्याहटवा
  2. मी नेहमी बिग बॉस बघायचे (सुरुवातीची सर्व पर्व).. सुरुवातीला थोडी मजा आली.. पण तुम्ही उल्लेख केलेले पर्व अगदीच तुक्कार होते यात वाद नाही...

    उत्तर द्याहटवा
  3. पियूजी, त्याचे अगदी सुरुवातीचे पहिले पर्वच खरे तर फक्त मस्त होते.रवी किशनने बऱ्याच वेळेला "जे डोक्याने टाकले होते" ते लाजवाब होते.खरे तर त्याच्या मुळे नि अर्षद वारसी मुळे मी हा शो बघायला लागलो.पण आंबा जसा उतरत जातो तसा प्रत्येक वर्षी हा शो जास्तीत जास्त रटाळ नि नीरस होत गेला.नि आता तर डोक्यातून उतरला कारण या वेळी त्या डॉली बिंद्राला आणून जे काही माकड चाळे केले गेले ...ती म्हणजे तर हाईट होती हाईट. कारण हा स्क्रिपटेड शो झालाय हे शेंबड्या पोराला पण कळले.

    उत्तर द्याहटवा