भोज्जा

रविवार, २० मार्च, २०११

अजुन पर्यंतचा नीरस वर्ल्ड कप

ह्याने सर्वांना आशा लाउन ठेवल्या आहेत.

पण ह्या बेजान खेळ पट्ट्या,खेळ खंडोबा करण्यात सर्वात पुढे आहेत.ताशी १४० + कि.मी. वेगाने चेंडू टाकुन सुद्धा स्पर्धेतील प्रमुख बोलर हैराण झालेले दिसतात.पांढऱ्या फटक खेळपट्ट्या नि कधी नव्हे पण का होईना निदान ह्या वेळी तरी हिरवे गार असणारे आउटफिल्ड बोलर्स साठी मात्र जीवघेणी ठरली आहेत.काही करून सामना  ५० --५० ओव्हर्स पर्यंत गेलाच पाहिजे ही प्रायोजकां साठी आय.सी.सी. ने घेतलेली दक्षता,खऱ्या क्रिकेटप्रेमीला खेळा पासून दूर नेत आहे.     
मित्रांनो,
कमकुवत संघांचा वारेमाप भरणा,कासवाच्या गतीने दिवसागणिक पुढे जाणारी स्पर्धा,बोलर्सच्या वैरी बनलेल्या खेळ पट्ट्या,भारत वगळता इतर यजमान देशात स्पर्धेस मिळणारा यथातथा प्रतिसाद, ह्या कारणास्तव हा वर्ल्ड कप आज पर्यंतचा सर्वात नीरस वर्ल्ड कप म्हणून स्पर्धे नंतर घोषित करण्यात आला तर आपल्या कुणालाच बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. खरय ना?
ह्या ऊपर ज्याचे त्याचे मत.कोण काय म्हणू शकणार?पण जर ... जर भारताने हा वर्ल्ड कप जिंकला तर ते   म्हणजे एखाद्या अगदी पूर्ण आंधळ्याने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात हरवलेली सुई शोधून देण्या सारखे असेल,म्हणजेच जेवढा आनंद त्याला त्या ही पेक्षा जास्त आनंद त्याला, जो त्याला सुई शोधताना पाहत होता त्याला.म्हणजेच प्रेक्षकाना, कारण त्याचे डोळे उघडे असतात ना?  ह्या कटु सत्यामागचे कारण म्हणजे ज्या टीमला  तिच्या ५० ओव्हर्स पूर्ण करण्या साठी बोलर्स निवडावे नव्हे शोधावे लागतात,ती टीम वर्ल्ड कप जिंकु शकेल हे स्वप्नच आहे आणि चार दोन विश्व विक्रमी फलंदाज,एवढीच पूंजी आणखी किती दिवस पुरणार? विकेट्स कुणी,कशा नि कधी काढायच्या हो ? हा धोनिच्या संघाला नव्हे ,तर हा प्रश्न  सगळ्यांनाच सध्या भेडसावतोय. क्रिकेट प्रेमींच्या दॄष्टीने तर हा जणू सध्याच्या परिस्तिथितील देशा पुढील फार गहन,नि  गंभीर प्रश्न आहे.       
तरी ही  अत्यवस्था असणाऱ्या पेशंटच्या जवळच्या नातेवाईक,मित्र मंडळी ह्यानी सुद्धा हार थोडीच मानायची असते? परमेश्वरी सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवतोच ना? नव्हे तो ठेवलाच पाहिजे. त्या बरहुकुम बघुयात त्या शक्तिमानाच्या मनात काय आहे ते? फ़क्त  माझ्या नव्हे, आपणा प्रत्येक भारतीयाच्या मनात हा वर्ल्ड कप आपणच जिंकावा ही मना पासून आस आहे ,ईच्छा आहे.ईश्वरा सहाय्य कर  रे बाबा !          
    

1 टिप्पणी:

  1. धोनीच्या संघाने वर्ल्डकप जिंकून आमच्या सारख्या भारतीय संघा वर जरा जास्तच प्रेम असलेल्या,अन केवळ त्या पोटी कधी कधी रागावून संघाच्या क्षमतेवर वेळ प्रसंगी अविश्वास ठेवलेल्या क्रिकेट प्रेमिंना सणसणित उत्तर दिलय.अगदी त्याच्या आजच्या सामन्यातील मारलेल्या शेवटच्या सिक्स सारख. शेवटी वर्ल्डकप जिंकलाच.अहो आम्हालाही हेच हव होत.सचिनच्या डोळ्यातले आनंदाश्रु पहायचे होते,आणि आमच्या डोळ्यातल्याना वाट करून द्यायची होती.भारताने दुसर्यांदा वर्ल्डकप जिंकताना साक्षीदार रहावायाचे होते.भारतीय संघाचे त्रिवार अभिनंदन,आम्हा क्रिकेटप्रेमिंच्या डोळ्याचे पारणे फेड्ल्या बद्दल.

    उत्तर द्याहटवा