भोज्जा

सोमवार, १५ जानेवारी, २०१८

फक्त एक चुकीचा निर्णय = मीना शौरी

मीना शौरी हिचे खरे नाव खुर्शीद जेहान. मूळच्या  पाकिस्तानी असलेल्या या नटीने १९५५ पर्यंत भारतीय सिनेमात नाव आणि पैसा कमवला पण १९५५ नंतर हि पाकिस्तानात गेल्यावर हिची ओळख बदलत गेली.एके काळच्या लारीलप्पा गर्ल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मीनाने  १९४० पासून १९६२ पर्यंत    एकूण ५ लग्ने केली. पण हिचे जे लग्न सगळ्यात जास्त टिकले ते हिंदू असलेल्या रूप के.शौरी यांच्या सोबत (१९४६ ते १९५६) आणि ती मीना शौरी या नावानेच  पुढे आयुष्यभर ओळखली गेली.

चित्रपटाची नायिका विनोदी अंगाने सादर करू शकणारी भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिली  अभिनेत्री अशी  हिची ओळख हि जास्त योग्य ओळख ठरेल.१९५५ चा  गुरुदत्तच्या  मि.एन्ड मिसेस ५५ या चित्रपटावरून प्रेरित होत पाकिस्तान मधील निर्माते जे एस आनंद यांच्या निमंत्रणावरून हि आणि शौरी पाकिस्तानांत गेले.तिथे शौरींनी मिस ५६ हा सिनेमा काढला . चित्रपटानंतर शौरी भारतात परतले पण मीना मात्र तिथेच रमली.विशेष म्हणजे रूप शौरींचा जन्म सुद्धा क्वेट्टा,पाकिस्तान मधलाच होता.  

मात्र पाकिस्तानी चित्रपटसृष्टीची तेव्हाची वास्तवता देखील हीच होती कि, मुंबईच्या चित्रपट सृष्टीच्या सहाय्या शिवाय,आधाराशिवाय  ती तगू शकत नव्हती आणि केवळ त्या मुळेच फाळणी नंतर जेवढे म्हणून मुस्लीम कलाकार,निर्माते,दिग्दर्शक भारत सोडून पाकिस्तानात कायमचे निघून गेले ,त्यातील जवळपास सगळ्यांचे तेथील उर्वरित आयुष्य हे अतिशय वाईट अवस्थेत गेले.साधारण १९६० नंतर तर ,१९४७ पर्यंत आपापसातील शिल्लक असणारा ओलावा ,जिव्हाळा हा देखील संपला व या सर्व मंडळींचा भारतातील परतीचा मार्ग बंद झाला.

हे थोडेसे अतिशयोक्तीपूर्ण वाटेल पण भारत-पाकिस्तान फाळणी नंतर लगेचच पुढे अवघ्या २ एक वर्षात मुस्लिमांनी भारतापासून वेगळे होण्याचा निर्णय हा १०० टक्के चुकीचा निर्णय आहे /होता  ही  वास्तवता सगळ्यांच्याच लक्षात येत होती आणि आली होती.त्या काळातील भारतीय चित्रपट आणि राजकारण या विषयाला वाहिलेल्या कै. बाबुराव पटेल यांच्या फिल्म इंडिया या मासिकांत संपादक या नात्याने  पटेलांनी वारंवार याचा उहापोह करत गंभीर इशारा सुद्धा त्या काळी दिला होता. पण त्या काळी भारतीय किंवा पाकिस्तानातील कोणतेही राजकीय व्यक्तिमत्व तेव्हा याचा विचार करण्याच्या मनःस्थितीत नव्हते.... त्या मुळेच आज २०१८ मधील पाकिस्तानची भीषण अवस्था बघता ,जाणकारांना त्याचे विशेष वाटत नाही.

म्हणजेच गम्मत बघा , १९४७च्या  फाळणी मुळे  पाकिस्तानात जन्म झाला असे मानले गेलेले  ,पण फाळणी नंतर सुद्धा तिकडे न गेलेले कलाकार म्हणजे, दिलीपकुमार,देवानंद ,राजकपूर किंवा जे  कलाकार ,गीतकार,संगीतकार,गायक  किंवा दिग्दर्शक  जे जन्माने मुस्लीम होते पण फाळणी नंतर सुद्धा जे पाकिस्तानात न जाता सच्चे भारतीय म्हणून इथेच राहिले व इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला ,व आज सुद्धा हयात आहेत त्यांना फक्त भारतीयच नव्हे तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांचे प्रचंड प्रेम लाभले. असो.


तर मीना शौरीचे पाकिस्तानातील आयुष्य ,खास करून १९७४ नंतरचे ,जेव्हा तिचे समकालीन इथे भारतात प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान होते तेव्हा , तिकडे ती मात्र अतिशय खस्ता हालत अनुभवत होती.पुढे जात तर तिची इतकी बिकट अवस्था झाली कि, ती गेल्यावर तिच्या पाशी कुणीही नव्हते आणि तिचा अंत्यसंस्कार एका धर्मादाय संस्थेला करणे भाग पडले... लारा-लप्पा गर्लचा असा हृदयद्रावक शेवट हा तिच्या एका चुकीच्या निर्णयाचे फलित होय.   मीना शौरीचे ते गाजलेले १९४९ च्या एक थी लडकी मधले  लारा-लप्पा गाणे फ्रेंड्स व्हिडीओ आणि पुरुषोत्तम आनंद यांच्या  सौजन्याने.



https://marathmolyagappa.blogspot.in/2018/01/blog-post_36.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा